पोलिसांना कारवाईचे टार्गेट देऊन सरकारची तिजोरी भरली जाते…माझ्याकडे पोलिसांचे स्क्रिनशॉट…नाना पटोले यांचा आरोप…
महाराष्ट्रातलं फडणवीस सरकार कसं महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला लुटत आहे यातूनही स्पष्ट होते……सरकार एकीकडे अदानी अंबानींना पैसे देण्यासाठी लागली आहे आणि गोरगरिबांना लुटायचं काम करत आहे.मी विधानसभेत जेव्हा प्रश्न उपस्थित केला की पोलिसांना कारवाईची टार्गेट देऊन सरकारची तिजोरी भरली जाते.तेव्हा राज्याच्या सरकार विधानसभेत सांगतो की आम्ही कुठलं टार्गेट दिलं नाही.पण माझ्याजवळ पोलिसांचा व्हाट्सअप ग्रुप वरचा डिस्कर्शन आहे.यात वरिष्ठांनी त्यांना इतक्या कारवाईच्या सूचना केल्याचे ते सांगतात.आणि हा टार्गेट दिल्याचं इथून दिसत आहे. माझ्या सरकारला सवाल आहे की गोरगरिबाला लुटायचा आहे.लाडक्या बहिणींना लुटायचा आहे? ते सरकारने तात्काळ थांबवलं पाहिजे.नाहीतर विधानसभेत सरकारने खोटी माहिती दिल्याबद्दल सरकारवर अविश्वास आणावा लागेल.गोरगरिबांची लूट बरोबर नाही फडणवीसांनी स्वतः यावर लक्ष दिले पाहिजे अशी आमची त्यांना विनंती…..((भंडारा जिल्ह्यात वाहतूक पोलिसांना कारवाईचा टार्गेट दिल्याचे व्हाट्सअप स्क्रीन शॉट समोर आले त्यावर ते बोलत होते))









