भंडारा जिल्हा परिषदेसमोर अंशकालीन महिला परिचारिकांच्या आंदोलनाला सुरुवात….मानधन नको तर किमान वेतन देण्याची मागणी….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सन 1966 पासून भंडारा जिल्ह्यात अंशकालीन महिला परिचारिका सेवा बजावत आहेत. परंतु एवढ्या वर्षांच्या सेवेनंतरही त्यांना समाधानकारक मानधन मिळालेले नाही. यामुळे परिचारिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. किमान वेतन द्यावे तसेच ‘अंशकालीन’ ही संज्ञा बदलून नियमित परिचारिका म्हणून मान्यता द्यावी, या मागण्यांसाठी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर महिला परिचारिकांनी आंदोलन छेडले. घोषणाबाजी करून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. “मानधन नव्हे तर किमान वेतन द्या” या घोषवाक्याने जिल्हा परिषद परिसर दुमदुमला होता. शासनाने तातडीने योग्य तो निर्णय घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी परिचारिकांनी केली आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें