भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासून अधूनमधून ऊन आणि मध्येच ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले. मात्र सायंकाळी अचानक पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा पसरला. या पावसामुळे नागरिकांना उन्हाच्या उकाड्यापासून दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांसाठीही हा पाऊस वरदान ठरला आहे. विशेषतः धान उत्पादक शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फायदा होणार आहे. योग्य वेळी आलेल्या या पावसामुळे पिकांच्या वाढीस चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भंडाऱ्यातील शेतकरी वर्ग पावसामुळे समाधान व्यक्त करीत असून, भविष्यात चांगल्या उत्पन्नाची आशा बाळगून आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 2