भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील मुख्य व्यवसाय शेती आहे. पण धान शेतीची वन्यप्राणी नासधूस करत आहेत. मोहाडी तालुक्यातील केसलवाडा येथिल शेतकरी शैलेश मेश्राम यांनी अडीच एकरात धान पीक लागवड केली. त्यांची शेती कोका अभयारण्याला लागून असल्याने जंगली डुक्कर त्यांच्या शेतात येऊन संपूर्ण अडीच एकरातील धान फस्त केला आहे. त्यामुळे आता शेतकरी चिंतेत सापडला आहे. याची तक्रार वनविभाला करून देखील वन विभाग लक्ष देत नसल्याचं आरोप शेतकरी करीत आहेत… त्यामुळे आता शेतकऱ्यांनी जगाव की मरावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे…
Author: vbn newsnetwork
Post Views: 109








